आजच्या काळात वाटत
मीरेचं प्रेम किती convenient होतं!
कारण तिचा कृष्ण कधी तिच्या जवळ नव्हताच!
ना तो तिला कुठल्या गोष्टीवरून मुर्खात काढायचा
ना तो तिला कधी फिरायला जाऊ सांगून उशिरा यायचा
तिने कितीही वेळा आय लव यु म्हटलं तरी त्याच्याकडून उत्तर येण्याची अपेक्षाच नव्हती.
मीरेचं प्रेम म्हणजे भातुकलीचा खेळ होता,
तीच प्रियकर आणि तीच प्रेयसी
भावल्याच्या मनात ती म्हणेल तेच भाव आणि भावली त्यातच खुश!
ना मतभेद ना रुसवे-फुगवे!
तीच स्वतःला कवटाळत असेल आणि घेत असेल कृष्ण प्रेमाचा आस्वाद
आजच्या काळात खरंच असं वाटतं ki मीरेचं प्रेम खूप practical होतं
ना तो तिला अडवू शकत होता
ना ती त्याला अडवू देणार होती
ना तिला त्याच्याकडून काही अपेक्षा होत्या
ना तिच्या अपेक्षांनी त्याला काही फरक पडणार होता
ती तिची तीच प्रेमात होती आणि कदाचित म्हणूनच प्रेम अजरामर झालं
मीरेला कधीच रुक्मिणी सारखा, 'जेवणात कृष्णाला काय आवडेल?' हा प्रश्न सोडवायचा नव्हता
ती बनवेल तीच पूर्वदिशा!
मीरेला कधीच राधेसारखा कृष्णाला सोडून जाण्याचा विरह सहन करायला लागणार नव्हता
कारण तो बॅक ऑफ द माइंडच होता की! ऑलवेज!
म्हणून आजच्या काळात खरंच असं वाटतं की मिरे सारख प्रेम करता यावं
कारण कुणालाच नकोय एक्सपेक्टेशन्स किंवा कॉम्प्लिकेशन्सच ओझं
प्रत्येकाला हवी आहे आपापली स्पेस
इथे कॉम्प्रोमाईज आणि sacrifice ला थाराच नाही.
त्यातून एक्सपेक्टेशन्स निर्माण झाल्याच तर तो त्याचा त्याचा प्रॉब्लेम!
दुसरा मग मूर्तीतला कृष्ण बनून गप्प बसू शकतो.
प्रश्नही तुमचेच, उत्तरही तुमचीच!
भावना ही तुमच्याच
आणि हार्ट ब्रेक ही तुमचाच!
नावापुरता फक्त एक कृष्ण हवा असतो हल्ली, नाहीतर नावापुरती मीरा!
बाकी सगळं कसं इंडिव्हिज्युअलिस्टिक हवं.
हिशोब करा आणि वाट धरा !
म्हणून आजच्या काळात मिरे सारखे प्रेम करता यावं
झंझटच नको, काय?