पावसा सारखा सरसर येतोस
आणि माझी होते तारांबळ..
टिपता टिपता ते चार क्षण
मनात उडतो पार गोंधळ
कधी येतोस कधी जातोस
तुझ तुला ठावूक
भावनांचा मदारी तू,
मी श्वान तुझे भावूक..
देउन जातोस ओलावा
पण मी आसूसते उबेला
तू गेल्यावर कुडकुडत बसते
मना शेजारी , कडेला.
कितीही उपरा ये,
पण येत जा अधून मधून
मनाच्या दाराला मी
तितकच घेते पुसून
जातानाही म्हण "येतो"
तितकाच भाबडा दिलासा
पुन्हा तुझी वाट पाहण्याचा
माझा अल्लड खुलासा..
शाल्मली.
No comments:
Post a Comment